मंगळवार, ११ जून, २०१३

म्हातारपण

म्हातारपण किती मुश्किल आहे
त्यांना वाटतेय आता यांना फक्त
दोन वेळच्या अन्नाची अन
औषधाचीच आता गरज आहे

आपण  नकोसे असणे
किती जीवघेणे असते
मरणयातना म्हणजे काय
हे अनुभवने असते

हो आम्ही जगलो वाढलो
अन म्तातारेही झालो
आता शरीर साथ देईनासे झाले
तर  जगण्यास का नालायक झालो???????

बालपण ते  प्रौढपण संपले
अन म्हातारपण सुरु झाले
पण म्हणून काय आमचे
आता जगणेच संपले  ???????

यांचे जिवंत असूनही
आम्हाला काय उपयोग आहे
हि नजरच जिवंत असतानाही
पुन्हा पुन्हा  मारत असते

तुम्हाला समजत नाही ….  
कळत नाही अक्कल  नाही …….
निट  राहा नाही तर जा दुसरयाकडे
हे जा जा काळजाला घरे पाडतात

त्यांच्या सणाला सुट्टीला
आमची  अडचण होते
अन हि अडगळ समजुन
माळया माळयावरून भिरकावली जाते

आता दिवस…महिने …वर्ष
हे चालूच  राहणार आहे
आमच्या अंतसमयीच का हे
आता सारे संपणार  आहे ??????????



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा