गुरुवार, ९ मे, २०१३

अजूनही मी एकटाच


सांगायला तर ते आई बाबा होते
रथाची ती दोन चाके मात्र नेहमी एकमेकांचे 
विरूद्धच धावत होती अन
आम्हा पाखरांचे नशिबी फक्त हिंदकळणेच होते  

स्वर्गातली त्यांची गाठ 
पृथ्वीवर नेहमीच उलटी होती 
त्यांचे नेहमीचेच युद्ध वार मात्र
आम्हीच झेलत होतो 

दोधांच्या वागयुद्धाला 
घरचीच रणभूमी मिळाली होती
हरनाऱ्यालाही शस्त्र चालवायला 
आमची पाठ मात्र नेहमी हक्काची होती

दिवस बदलले, बदलले वारे 
प्रत्येक गोष्टीला मोहताज मी 
माझ्या कष्टाचे चीज झाले 
सर्व भौतिक सुख घरात आले 

माझ्या एकट्याचीही 
सुंदर चौकट झाली 
आता मात्र दोघांचेही एकमत आहे 
दोघांच्याही कष्टांमुळे???? माझे हे यश आहे 

आज मी भौतिक जगात यशस्वी अन सुखी? आहे 
मुलांसोबत आईबाबांचाही पालनकर्ता आहे 
जे हवे ते मिळवण्याची हिम्मत आहे 
असे सगळ्यांनाच वाटत आहे 

पण माझं होरपळलेले बालपण,तारुण्य
मी.....अजूनही एकटाच आहे 
कितीही अट्टाहास केला तरीही,
कितीही कष्ट केले तरीही मिळेल काहो मला ते निरागस,निर्मळ कोमल बालपण ......................
by Manaswi

बुधवार, ८ मे, २०१३

मी असा......मी तसा


जीवन जगताना बाहेरून कसेही वागलो तरीही 

अंतर्मनात एक द्वंद नेहमीच चालू असते 
ऐहिक जगात जिंकण्याच्याच उर्मीने जगणारे आम्ही 
आतमध्ये मात्र स्वतःला चांगलेच ओळखून असतो 

महागाई,बेकारी ,भ्रष्टाचार,बलात्कार 
सगळ्यावरच आम्ही पोटतिडकीने टिपण्या देतो
पण आतमध्ये डोकावून पहिले तर जाणवतं 
खरंच का टिपन्यांच्या एक टक्का तरी आम्ही जगतो ?

कधी कधी वाटते कशासाठी हा अट्टाहास 
आहोत तसेच व्यक्त व्हावे 
अन नंतर काय होईल ते पाहून घ्यावे
जे होईल त्याला सामोरे जावे  

पण स्वार्थीजीव तसे वागू देईल तर शपथ्थ 
क्षणभंगुर आयुष्याचे वाटेकरी आम्ही 
अमर असल्याप्रमाणे जगत असतो म्हणूनच तर
शेवटच्या क्षणापर्यंत मी असा मी तसा चा नारा चालूच असतो.